Ad will apear here
Next
उद्योजक शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य यांच्या कथा आपल्याला माहित असतात; पण त्यापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यातील एक म्हणजे ते उद्योजक होते, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी सांगितले असून, त्यांच्या या गुणावर प्रकाश टाकला आहे. स्वतःचा उद्योग व्यवसाय करणे हाच खरा श्रीमंतीचा मार्ग असल्याचे शिवरायांनी मराठी माणसांना सांगितले, असे लेखक म्हणतात. म्हणूनच ‘स्वराज्य’ म्हणजेच स्वतःचे राज्य, स्वतःचा व्यवसाय करण्याचे ध्येय त्यांनी बाळगले.

स्वराज्याची स्थापनेची ध्येयप्राप्ती त्यांनी कशी केली हे यात स्पष्ट केले आहे. स्वराज्य उद्योग म्हणजे काय, स्वराज्य उभारणी, पायाभूत सुविधांची उभारणी, खर्चाशिवाय स्वराज्य विस्तार, ग्राहक म्हणजेच रयतेचे समाधान, औद्योगिक सुरक्षा, कर्मचारी कल्याण योजना, रेन हार्वेस्टिंग, नवीन कल्पनांना ध्यास, नैसर्गिक साधनांचा उपयोग, प्रादेशिक समतोल अशा अनेक संकल्पना शिवाजी महाराजांनी स्वराज्य बांधणीत प्रत्यक्ष कशा उतरविल्या याचे विवेचन आजच्या उद्योग जगतामधील संकल्पनांचा आधार घेत केले आहे.   

प्रकाशन : राजमाता प्रकाशन
पृष्ठे : १९७
मूल्य : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZKFBU
Similar Posts
उद्योजक- शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे आचार-विचार, कर्तृत्व, कारकीर्द, साहस यांचा अभ्यास केला, तर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. प्रा. नामदेवराव जाधव यांनी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्या उद्योजकतेचा परिचय करून दिला आहे.
गनिमी कावा शत्रूचे हजारोंचे सैन्य असतानाही शिवाजी महाराजांचे ३००-४०० मावळे त्यांना जेरीस आणीत असत. हे शक्य होत असे ते शिवरायांना अवलंबिलेल्या गनिमी कावा या युद्ध तंत्राने. नियोजनबद्ध नियंत्रित हल्ले हे सूत्र असलेले हे युद्धतंत्र आणि त्याद्वारे महाराजांनी फत्ते केलेल्या मोहिमांची माहिती प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘गनिमी कावा’ या पुस्तकातून दिली आहे
जिजाऊ- द मदर ऑफ ऑल गुरुज् मुलांचे संगोपन ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे; मात्र आदर्श माता बनायचे असेल, तर जिजाऊ आईसाहेबांना आदर्श ठेवायला हवा. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना बालपणापासून दिलेले संस्कार त्यांना स्वराज्य मिळवण्यासाठी आणि ते राखण्यासाठी उपयुक्त ठरले.
शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र कोणत्याही संस्थेची उभारणी करायची असेल, तर अर्थव्यवस्थापन ही महत्त्वाची गोष्ट असते. शिवाजी महाराजांनी, तर स्वराज्याची उभारणी केली. त्यासाठी त्यांनी आर्थिक व्यवस्थापन कसे केले असेल, हा कुतूहलाचा विषय आहे. प्रा. नामदेवराव जाधव यांनी या पुस्तकात महाराजांच्या अर्थशास्त्रावर प्रकाश टाकला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language